बदल्या ...
यंदा तरी होईल बदली...मनापासून वाटतंय...
प्रशासनाची होईल मर्जी ...मनापासून वाटतंय...
'का रे दुरावा'...असा प्रश्न पडत राहतो...
'पगार आहे डबल'..म्हणून समाज आम्हाकडे पाहतो
पैसा जवळ ...हक्काचा माणुस दूर म्हणून डोळ्यात पाणी साठतय...
यंदा तरी होईल बदली... मनापासून वाटतंय...
नोकरीत स्थिर व्हाव ...म्हणून तिन वर्षे गेली..
संसारापुरत कमवाव ..म्हणून आणखी तिन गेली...
लग्न करुण फसलो राव...सन्यास्याचच जीवन सोप वाटतंय...
यंदा तरी होईल बदली...मनापासून वाटतंय...
बरे असते बालपनच...सर्वांगीण विकासाचा विचार होतो..
कुणीच् विचार करत नाही...जेव्हा या बालकातला मानुस मोठा होतो...
याच जगातले का आम्ही..म्हणून शंकांच् मनी ढग दाटतय...
यंदा तरी होईल बदली अस मनापासून वाटतंय...
'पति पत्नी एकत्रीकरण'...गोंडस किती नाव आहे...
वर्षानुवर्षे बदल्या राखडल्या...हा तर विभाजनाचा डाव आहे..
किती ठिगळ जोड़नार मनाला....इथ भावनांच् आकाशच फाटतय...
पण गुरुजनहो.....
यंदा तरी होईल बदली अस मनापासून वाटतंय...मनापासून वाटतंय...
बनसुडे धनराज
प्रशासनाची होईल मर्जी ...मनापासून वाटतंय...
'का रे दुरावा'...असा प्रश्न पडत राहतो...
'पगार आहे डबल'..म्हणून समाज आम्हाकडे पाहतो
पैसा जवळ ...हक्काचा माणुस दूर म्हणून डोळ्यात पाणी साठतय...
यंदा तरी होईल बदली... मनापासून वाटतंय...
नोकरीत स्थिर व्हाव ...म्हणून तिन वर्षे गेली..
संसारापुरत कमवाव ..म्हणून आणखी तिन गेली...
लग्न करुण फसलो राव...सन्यास्याचच जीवन सोप वाटतंय...
यंदा तरी होईल बदली...मनापासून वाटतंय...
बरे असते बालपनच...सर्वांगीण विकासाचा विचार होतो..
कुणीच् विचार करत नाही...जेव्हा या बालकातला मानुस मोठा होतो...
याच जगातले का आम्ही..म्हणून शंकांच् मनी ढग दाटतय...
यंदा तरी होईल बदली अस मनापासून वाटतंय...
'पति पत्नी एकत्रीकरण'...गोंडस किती नाव आहे...
वर्षानुवर्षे बदल्या राखडल्या...हा तर विभाजनाचा डाव आहे..
किती ठिगळ जोड़नार मनाला....इथ भावनांच् आकाशच फाटतय...
पण गुरुजनहो.....
यंदा तरी होईल बदली अस मनापासून वाटतंय...मनापासून वाटतंय...
बनसुडे धनराज
या ओळी तुम्हांला नक्की आवडतील
सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी..
आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.
"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुनपडावं लागतं"...
Bansude D.S.
आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.
"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुनपडावं लागतं"...
Bansude D.S.